“शंकराचार्यच नाहीत” म्हणून माघी स्नानापासून रोखलं! योगी सरकारवर माजी आमदारांचा हल्लाबोल

माघी शाही स्नानापासून वंचित, सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल

लखनौ/मुंबई: योगी सरकारने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद जी यांना माघी शाही स्नान करण्यापासून रोखल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून या घटनेवर जोरदार टीका केली आहे.

काय आहे प्रकरण?

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद जी यांना योगी आदित्यनाथ सरकारच्या प्रशासनाने नोटीस पाठवून माघी शाही स्नानापासून रोखलं आहे. इतकंच नव्हे तर आता “ते शंकराचार्यच नाहीत” असं ठरवण्याचा खटाटोप देखील राबविला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल झाला आहे.

शंकराचार्यांनी विचारले प्रश्न

योगी सरकारच्या प्रशासनाने पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देताना शंकराचार्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. त्यांनी या निर्णयाला आव्हान दिलं आहे.

“राजकीय सूडबुद्धी” – माजी आमदारांचा आरोप

माजी आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, “शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद जी यांच्या बाबत भाजप सरकार राजकीय सूडबुद्धीने वागतंय. ज्या पद्धतीने भाजप आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने त्यांच्याशी गैरवर्तन केलं आहे, त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागायला हवी!”हा प्रकार धार्मिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *